पोस्ट्स

श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन

इमेज
 संकट मोचन हनुमान उत्सव समिती संगमनेर आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा निमित्त भव्य शोभा यात्रेचे आयोजन    संगमनेर/ प्रति : हनुमान जन्मोत्सव निमित्त शहरात विविध ठिकाणी मोठ्या जल्लोष म्हणून वातावरणात हा उत्सव साजरा होत असतो यातच संगमनेर शहराच्या केंद्रबिंदूस्थानी असलेले संकट मोचन हनुमान उत्सव समिती संगमनेर यांच्या वतीने सालाबादप्रमाणे हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते व त्याचबरोबर विविध कार्यक्रमांनी हा जन्मोत्सव सोहळा आनंद उत्सव पार पडत असतो या निमित्ताने आज सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.  या शोभा यात्रेचे प्रारंभ संगमनेर पोलीस स्टेशन संकट मोचन हनुमान मंदिर या ठिकाणावरून शोभायात्रेची सुरुवात होणारा असून ती शहरातील विविध भागांतून शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रेचे निघणाऱ्या मार्गावरून सर्वच भाविक भक्त यानिमित्ताने स्वागत करीत असतात फटाक्यांची आतिषबाजी पुष्पवृष्टी इतर विविध प्रकारच्या प्रमुख आकर्षणांनी ही शोभायात्रा संपन्न होत असते. शोभायात्रा संगमनेर शहर पोलीस स्टेशन संकट मोचन हनुमान मंदिर येथून शोभाय...

पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आंदोलनाचा एल्गार :संदीप काळे पुण्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची पत्रकार सुरक्षा परिषद

इमेज
 पुणे/प्रति : पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी आता थेट आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. पत्रकारांवरील वाढते हल्ले, दबाव आणि अन्यायाविरोधात संघटित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करत, त्यांनी देशभरातील पत्रकारांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.   “पत्रकार सुरक्षित तर लोकशाही मजबूत” हा संदेश देत ही चळवळ आता निर्णायक संघर्षाच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. संघटनात्मक बांधणीतून पुण्यात आता ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेची मोठी ताकद उभी राहिली आहे . देशातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने पुण्यात आयोजित करण्यात आलेली ‘पत्रकार सुरक्षा परिषद’ अत्यंत उत्साहपूर्ण, विचारप्रवर्तक आणि दिशादर्शक ठरली. पत्रकारांचे अधिकार, हक्क आणि बदलत्या मीडिया व्यवस्थेतील आव्हाने यांवर या परिषदेत सखोल मंथन करण्यात आले. राज्यभरातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने या परिषदेत सहभाग नोंदवत आपले...

स्व. कुसुमताई भीमराव पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुंजाळवाडी येथील मुख्य रस्त्याचे नामकरण करण्यात आले.

इमेज
 'स्व. कुसुमताई भीमराव पवार' यांचे वर्षश्रध्द ह.भ.प. विनोद महाराज राऊत यांच्या कीर्तनाने संपन्न संगमनेर प्रति : "तू माऊली मवाळ, तू पाण्याहून पातळ..." या संतवचनाप्रमाणे ज्यांनी आयुष्यभर वात्सल्याचा वर्षाव केला, अशा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या मातोश्री स्व. कुसुमताई भीमराव पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुंजाळवाडी येथील मुख्य रस्त्याचे नामकरण करण्यात आले. अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात ह.भ.प. विनोद महाराज राऊत यांच्या कीर्तन सेवेने वर्षश्राद्धाचे विधी संपन्न झाले.       -----------रस्त्याचे नामकरण आणि श्रद्धांजली------------ एक वर्षापूर्वी कुसुमताईंचे निधन झाल्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.  त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी गुंजाळवाडी येथील रस्त्याला त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या नामकरण सोहळ्यावेळी ग्रामस्थ आणि मान्यवरांनी कुसुमताईंच्या प्रेमळ स्वभावाच्या आणि सामाजिक योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला.       ----------भक्तीमय वातावरणात कीर्तन सेवा---------...

महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्याने कडक कायदे करा

इमेज
वडगाव पान येथील चिमुकली वरील ॲसिड हल्ला अत्यंत दुर्दैवी--डॉ. जयश्रीताई थोरात  संगमनेर प्रति : वडगाव पान येथील तेरा वर्षाची मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना तिच्यावर अज्ञात इसमाने ॲसिड हल्ला केला. हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी असून या गुन्हेगाराचा तातडीने शोध लावून त्याला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी करताना सरकारने महिलांच्या सुरक्षा बाबत प्राधान्याने कडक कायदे केले पाहिजे अशी आग्रही मागणी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे. वडगाव पान येथील लहान मुलीवर झालेल्या हल्ल्याची बातमी कळताच डॉ जयश्रीताई थोरात यांनी तातडीने तिची प्रवरा मेडिकल हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली याचबरोबर कुटुंबीयांना धीर दिला.  यानंतर या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्या संतप्त होऊन म्हणाल्या की झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे अवघ्या तेरा वर्षाच्या लहानग्या चिमुकलीवर ॲसिड हल्ला होतो आहे हे किती वाईट आहे. ईश्वरीच्या  वडिलांचे निधन झालेले आहे .आई अत्यंत गरीब आहे. ही मुलगी मामाकडे राहते .शिक्षण घेते आणि असे असताना शाळा सुटल्यानंतर घरी जाताना रोड वरून कोणीतरी अज्ञ...

संगमनेरमध्ये ‘स्त्रीशक्ती गौरव सन्मान २०२६’ — कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

इमेज
संगमनेरमध्ये ‘स्त्रीशक्ती गौरव सन्मान २०२६’ — कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव  संगमनेर प्रति: जगाला संस्कार, संवेदना आणि सामर्थ्य देणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव करण्याच्या उद्देशाने जागतिक महिला दिनानिमित्त श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या., संगमनेर आणि साहित्य कुंज मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्त्रीशक्ती गौरव सन्मान २०२६’ या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० कर्तृत्ववान महिलांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करून त्यांच्या प्रेरणादायी कार्यगाथा समाजासमोर मांडण्याचा हा मनस्वी प्रयत्न आहे. हा सन्मान सोहळा शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता कृष्णा गार्डन, मेडिकव्हर हॉस्पिटल जवळ, संगमनेर येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमासाठी मा. अॅड. सौ. ज्योती मालपाणी (समुपदेशक व सामाजिक कार्यकर्त्या) आणि पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपेरे (बीजसंवर्धन जननी) या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संगमनेर शहर व परिसरातील नागरिक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क...

पेमगिरी शहागड संवर्धनासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करा

इमेज
आमदार अमोल खताळ यांची विधान सभेत जोरदार मागणी संगमनेर प्रति :संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागड किल्ल्या च्या संवर्धनासाठी राज्य शासनाने दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्यात यावा,तसेच संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये २८ ऑगस्ट हा दिवस “हिंदवी स्वराज्य संकल्प दिन” म्हणून साजरा करण्यात यावा,अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात सरकारकडे केली.  संगमनेर तालुक्यातील पेमगिरी (शहागड) ऐतिहासिक दुर्गाचे पुरेसे जतन व संवर्धन होत नसल्याने हा अमूल्य वारसा दुर्लक्षित अवस्थेत आहे. योग्य नियोजन आणि संवर्धन न झाल्यास या ऐतिहासिक ठेव्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. शहागडाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने दीर्घकालीन विकास आराखडा तयार करावा,अशी मागणी करताना पुरातत्व, सांस्कृतिक आणि पर्यटन विभागांनी समन्वय साधावा, असेही त्यांनी सुचविले. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्या दुर्गाचे संवर्धन करावे तसेच पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा विकसित करून या स्थळाला ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे, असेही त्यांनी सभागृहात स्पष...

रस्त्यांसाठी ३१ कोटी रूपयांचा निधी मंजूर- आ. खताळ

इमेज
२५ कोटी रस्त्यांसाठी, ६ कोटी म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी; वाहतूक सुधारणा व ग्रामीण विकासास चालना संगमनेर/ प्रति : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी २५ कोटी व वेल्हाळे ते राजापूर म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी ६ कोटी असे एकूण ३१ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच  अर्थ संकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पामध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे या निधीतून कोकणगाव ते मांची घाट, सुकेवाडी ते राष्ट्रीय महामार्ग ५० , चिंचेवाडी-साकूर, ते राष्ट्रीय महामार्ग ७१ ते मारुती मंदिर, अकोले नाका शारदा शाळा ते तीन बत्ती चौक, निमगाव बुद्रुक गाव, राजापूर तसेच जोर्वे नाका  ते निंबाळे चौफुली नान्नज दुमाला ते पारेगाव बुद्रुक, निमगाव टेंभी ते शिरापू...