पोस्ट्स

संगमनेरमध्ये ‘स्त्रीशक्ती गौरव सन्मान २०२६’ — कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

इमेज
संगमनेरमध्ये ‘स्त्रीशक्ती गौरव सन्मान २०२६’ — कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव  संगमनेर प्रति: जगाला संस्कार, संवेदना आणि सामर्थ्य देणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव करण्याच्या उद्देशाने जागतिक महिला दिनानिमित्त श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या., संगमनेर आणि साहित्य कुंज मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्त्रीशक्ती गौरव सन्मान २०२६’ या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० कर्तृत्ववान महिलांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करून त्यांच्या प्रेरणादायी कार्यगाथा समाजासमोर मांडण्याचा हा मनस्वी प्रयत्न आहे. हा सन्मान सोहळा शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता कृष्णा गार्डन, मेडिकव्हर हॉस्पिटल जवळ, संगमनेर येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमासाठी मा. अॅड. सौ. ज्योती मालपाणी (समुपदेशक व सामाजिक कार्यकर्त्या) आणि पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपेरे (बीजसंवर्धन जननी) या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संगमनेर शहर व परिसरातील नागरिक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क...

पेमगिरी शहागड संवर्धनासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करा

इमेज
आमदार अमोल खताळ यांची विधान सभेत जोरदार मागणी संगमनेर प्रति :संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागड किल्ल्या च्या संवर्धनासाठी राज्य शासनाने दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्यात यावा,तसेच संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये २८ ऑगस्ट हा दिवस “हिंदवी स्वराज्य संकल्प दिन” म्हणून साजरा करण्यात यावा,अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात सरकारकडे केली.  संगमनेर तालुक्यातील पेमगिरी (शहागड) ऐतिहासिक दुर्गाचे पुरेसे जतन व संवर्धन होत नसल्याने हा अमूल्य वारसा दुर्लक्षित अवस्थेत आहे. योग्य नियोजन आणि संवर्धन न झाल्यास या ऐतिहासिक ठेव्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. शहागडाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने दीर्घकालीन विकास आराखडा तयार करावा,अशी मागणी करताना पुरातत्व, सांस्कृतिक आणि पर्यटन विभागांनी समन्वय साधावा, असेही त्यांनी सुचविले. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्या दुर्गाचे संवर्धन करावे तसेच पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा विकसित करून या स्थळाला ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे, असेही त्यांनी सभागृहात स्पष...

रस्त्यांसाठी ३१ कोटी रूपयांचा निधी मंजूर- आ. खताळ

इमेज
२५ कोटी रस्त्यांसाठी, ६ कोटी म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी; वाहतूक सुधारणा व ग्रामीण विकासास चालना संगमनेर/ प्रति : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी २५ कोटी व वेल्हाळे ते राजापूर म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी ६ कोटी असे एकूण ३१ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच  अर्थ संकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पामध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे या निधीतून कोकणगाव ते मांची घाट, सुकेवाडी ते राष्ट्रीय महामार्ग ५० , चिंचेवाडी-साकूर, ते राष्ट्रीय महामार्ग ७१ ते मारुती मंदिर, अकोले नाका शारदा शाळा ते तीन बत्ती चौक, निमगाव बुद्रुक गाव, राजापूर तसेच जोर्वे नाका  ते निंबाळे चौफुली नान्नज दुमाला ते पारेगाव बुद्रुक, निमगाव टेंभी ते शिरापू...

राज्यसभेवर तिसऱ्यांदा संधी मिळाल्यानंतर रामदास आठवले भावूक

इमेज
शिर्डीचा खासदार होण्याची माझी तीव्र इच्छा : ना. रामदास आठवले शिर्डी:प्रति: राज्यसभेवर तिसऱ्यांदा वर्णी लागल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करण्यासोबतच विविध राजकीय घडामोडींवर आपली रोखठोक मते मांडली. "शिर्डीचा खासदार होण्याची माझी खूप इच्छा होती, मात्र आता मी राज्याचा (राज्यसभा) खासदार आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रामदास आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विश्वासामुळे मला तिसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. अशी संधी मिळणारा मी एकमेव खासदार असून, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. "एकेकाळी आमचे ९ खासदार होते, मात्र आता सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची माझी भूमिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एकतेचा आणि संविधानाचा संदेश घेऊन मी देशभर काम करणार आहे," असा संकल्प त्यांनी यावेळी सोडला.आपल्या पक्षाच्या विस्तारा...

सामाजिक बांधिलकीतून उद्योजक बाळासाहेब देशमाने यांचा वाढदिवस साजरा

इमेज
धांदरफळ बुद्रुक येथे विविध सामाजिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद; संगमनेर प्रति : तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील भूमिपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब भास्करराव देशमाने यांचा वाढदिवस केवळ शुभेच्छांचा वर्षाव न ठरता सामाजिक उत्तरदायित्वाचा सोहळा ठरला. स्वदेश युवा प्रतिष्ठान, स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध आरोग्य व प्रशासकीय शिबिरांनी या वाढदिवसाला अनोखी उंची प्राप्त करून दिली. बाळासाहेब देशमाने हे नेहमीच ग्रामविकास आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात आले. 'असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी' या मोहिमेअंतर्गत रोटरी आय केअर ट्रस्टच्या सहकार्याने ७५ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रोटरी आय केअर हॉस्पिटलमध्ये मोफत उपचारांचे मार्गदर्शन व निवड करण्यात आली. देशातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, अर्पण रक्तपेढीच्या माध्यमातून तरुण युवकांनी उत्स्फूर्तपणे ...

आ. सत्यजित तांबे यांनी नाशिक पुणे रेल्वे सरळ मार्गाबाबत अधिवेशनात मांडला प्रश्न

इमेज
आ सत्यजित तांबे यांचा सरळ मार्गासाठी लढा सुरू संगमनेर (प्रतिनिधी)--लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे सर्वांना सोयीचा व नैसर्गिकरित्या  सरळ मार्गे निश्चित झाला होता. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मार्ग बदलण्याबाबत संभ्रम निर्माण झाला असून ही हाय स्पीड रेल्वे सरळ मार्गे व्हावी याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला आहे.मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत आमदार सत्यजित तांबे यांनी ही मागणी केली यावेळी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ मंत्री उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती प्रा. नामदार राम शिंदे हे होते.रेल्वे प्रश्नाबाबत मागणी करताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, नाशिक पुणे रेल्वे व्हावी ही अनेक दिवसापासून ची मागणी आहे. मात्र नियोजित मार्ग ऐवजी केंद्रसरकारकडून मार्ग बदलण्याचा निर्णय झाला. ही रेल्वे महारेल कडून आता ती सेंट्रल रेल्वेकडे गेली म्हणून या रेल्वेचा राज्य सरकारची संबंध आहे. सेंट्रल रेल्वेकडे हे काम...

‘अभंग रिपोस्ट’ने घडविली पंढरीची वारी; संगमनेर मर्चन्ट्सच्या ‘प्रेरणा दिना’चा शुभारंभ

इमेज
 सहकाराची ताकद विश्वासामध्ये - राजेश मालपाणी ; संगमनेर, प्रति; सहकाराची खरी ताकद विश्वासामध्ये आहे. या अद्भुत शक्तीच्या बळावरच संगमनेर मर्चंट बँकेने सातत्यपूर्ण प्रगतीची दिमाखदार साठवर्ष पूर्ण केली आहेत, असा विश्वास संगमनेर मर्चंट बँकेचे चेअरमन राजेश मालपाणी यांनी व्यक्त केला. मर्चन्ट्स बँकेचे संस्थापक अध्यक्ष व संगमनेरचे भूषण उद्योगपती स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांच्या जयंतीनिमित्त सुरू झालेल्या तीन दिवसीय ‘प्रेरणा दिन’ उपक्रमाच्या पहिल्या दिवशी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष डॉ.मैथिली तांबे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ललितादेवी मालपाणी, व्हाईस चेअरमन मधुसूदन नावंदर, प्रकल्प समितीचे अध्यक्ष प्रकाश कलंत्री, तज्ञ संचालक सीए.संजय राठी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई आदी उपस्थित होते, यावेळी पुढे बोलताना मालपाणी म्हणाले की, साठ वर्षांपूर्वी बँकेच्या स्थापनेच्या वेळचे चित्र वेगळे होते. मात्र काळ कितीही बदलला तरीही सचोटी, पारदर्शकता, काटकसर, ग्राहकाभिमुखता ही तत्वे बदलत नाहीत. त्यांचे महत्त्व कायम आहे. संस्थापक स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांनी या तत्...